भारताची आर्थिक राजधानी म्हणविल्या जाणाऱया मुंबई शहरालगत असलेले ठाणे हे खूप प्राचीन शहर आहे. ठाण्यास आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वही तेवढेच आहे. ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी देखील मानली जात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे शहरावर विशेष प्रेम होते. या प्रेमापोटीच शिवसेना आणि ठाणे हे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. ठाणे शहरातील बांधवांनी मला शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने निवडून दिले व मला ठाणे शहराच्या विकासामध्ये हातभार लावण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
ठाणे शहराचा आमदार या नात्याने आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निवडणुकीपूर्वी कार्यपूर्तीच्या आश्वासनांपैकी जवळ जवळ सर्वच कामे आजच्या घडीला पूर्ण झालेली आपल्या नजरेस आली असतील.